परदेशातील पक्ष्यांमुळे परभणी येथे ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव ! – प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय 

मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधार्‍यावर येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांनी ‘बर्ड फ्ल्यू’ येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील पशूविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला आहे.

‘बर्ड फ्ल्यू’मुळे मुरुंबा (जिल्हा परभणी) गावात संचारबंदी लागू

मुरुंबा गावात ‘बर्ड फ्ल्यू’मुळे अनुमाने ८०० कोंबड्यांच्या मृत्यू झाला. गेल्या २ दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. हा आजार पसरू नये; म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात संचारबंदी लागू केली आहे.

राज्यातील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांचे लाक्षणिक उपोषण

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे या मुख्य मागण्यांसाठी ११ जानेवारी या दिवशी सकाळपासून राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात महिलेकडून अत्याचार केल्याचा आरोप 

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह १७ जण निर्दोष मुक्त

या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे आंदोलकांकडून उल्लंघन झाले होते. यामुळे पोलिसांनी आमदार भोसले आणि समर्थकांवर गुन्हा नोंद केला होता.

गोरेगाव (जिल्हा हिंगोली) येथे निवडणुकीच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याप्रकरणी ६० जणांवर गुन्हा नोंद  

‘तू आमच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणूक का लढवतो ?’ या कारणावरून ६० जणांनी मारहाण केली.

पवई (मुंबई) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण

आमदार राम कदम यांनी आरोपींना सोडण्याची विनंती केल्यामुळे टीका

महिला या ऊर्जेचा स्रोत असल्याने त्यांना कोणीही न्यून लेखू नये ! – माजी केंद्रीय मंत्री उमा भारती

महिला या ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यांना कोणीही न्यून लेखू नये. देशातील कोणत्याही महिलेला पुरुषासमोर पैशांसाठी हात पसरावा लागणार नाही, अशी आर्थिक स्थिती निर्माण करणे आवश्यक आहे.

उद्गार प्रकाशनाच्या वतीने ‘ताजमहाल हे तेजोमहालय आहे’ हे पुस्तक विक्रीस उपलब्ध

नामांकित इतिहास संशोधक पु.ना. ओक यांनी लिहिलेल्या या मराठी आवृत्तीचे मूल्य ३२० रुपये असून, इंग्रजी आवृत्ती ३७५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोल्हापुरात पोलिसांना पुढील काळात १५ दिवसांची सक्तीची रजा !

सततच्या ताणामुळे मानसिक स्थिती तणावग्रस्त असते. त्याचा परिणाम नियमित कामकाजावर होत आहे. त्यात कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. याकरीता वर्षातील १५ दिवस अशी रजा सक्तीने कर्मचार्‍यास घ्यावी लागणार आहे.