पडवणे डोंगरावर भीषण आग
तालुक्यातील पडवणे डोंगरावर सहस्रो एकर परिसर आगीत बेचिराख झाला. या डोंगरावर आंब्याच्या बागा असल्याने मोठी हानी झाली असण्याची शक्यता आहे, तसेच शेतमांगरही जळून गेले आहेत. या घटनेची भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहाणी केली.
तालुक्यातील पडवणे डोंगरावर सहस्रो एकर परिसर आगीत बेचिराख झाला. या डोंगरावर आंब्याच्या बागा असल्याने मोठी हानी झाली असण्याची शक्यता आहे, तसेच शेतमांगरही जळून गेले आहेत. या घटनेची भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहाणी केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वीज खात्यातील ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची नियुक्ती रहित केली आहे. अंतिम उमेदवारी सूची सिद्ध करतांना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. ३२ ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर्स’ची ही नियुक्ती वर्ष २०१६ मध्ये करण्यात आली होती.
सीमा सुरक्षा दलातील एक उपनिरीक्षक पाओतिंसत गुइते हुतात्मा , पाकला नष्ट केल्याविना या घटना थांबणार नाहीत !
खनिज मालाच्या वाहतुकीवरून आंदोलन करणारे स्थानिक नेते तथा होंडा (सत्तरी) पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य सुरेश माडकर यांना वाळपई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून होंडा येथे २ डिसेंबर या दिवशी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया नव्याने चालू करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे.
गोव्याच्या मंत्रीमंडळात फेरपालट करण्यात येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री मायकल लोबो यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर मंत्रीमंडळात फेरपालट करणार असल्याचे सांगितले होते.
याचिकाकर्ते सॉफ्टवेअर इंजिनीयर वजीद खान यांनी सॉफ्टवेअर इंजिनीयर राम्याशी विवाह केला. महिला संरक्षण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या राम्याला न्यायालयासमोर उपस्थित करून तिची सुटका करण्याची मागणी वजीदने केली होती.
एम्.बी.बी.एस्.च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी टिळक चौक येथे एम्.बी.बी.एस्.च्या प्रथम वर्ष परीक्षेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी अल्प व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन अन् वाहतूक शाखा यांच्या वतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दिवसभरात ४१ वाहने जप्त करण्यात आली.
डहाणूहून चर्चेगेटकडे सुटणारी पहाटेची पहिली लोकल रहित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात प्रवाशांनी रेल्वे बंद आंदोलन पुकारले.