कोरोनामुळे मुंबईतील ८७६ इमारती सील; प्रतिदिन सरासरी ६४४ रुग्ण

८ फेब्रुवारी या दिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५७४ दिवस इतका होता, तो आता २१ फेब्रुवारीपर्यंत ३२१ दिवसापर्यंत घसरला आहे. मुंबईत बरे होणार्‍या रुग्णांचा दर ९४ टक्के इतका आहे.

विदर्भासाठी ऑक्सिजनचा पुरेसा साठा, आवश्यकता भासल्यास मुंबईतून पुरवठा करणार ! – अन्न आणि औषध प्रशासन 

कोरोना रुग्णांतील गंभीर रुग्णांचा आकडा अल्प झाल्याने राज्यातील ऑक्सिजनची वाढलेली मागणी मागील ३ मासांत पुष्कळच अल्प झाली होती; मात्र या आठवड्यात विदर्भातील ऑक्सिजनच्या मागणीत काहीशी वाढ झाली असून पुढील १५ दिवसांत मागणी वाढण्याची भीती आहे.

२५ फेब्रुवारी या दिवशी होणारा सकल ओबीसी मेळावा स्थगित ! – अरुण खरमाटे

कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाल्यावर काही दिवसांतच मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती मेळाव्याचे मुख्य संयोजक अरुण खरमाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जालना येथील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंगारकीच्या दिवशी श्री राजुरेश्‍वर गणेश मंदिर बंद !

येत्या २ मार्च या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रतिबंधात्मक आदेशांनुसार अंगारकी चतुर्थीनिमित्त १ मार्च या दिवशी सायंकाळी ते २ मार्च या रात्री उशिरापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

कुख्यात गुंड रवि पुजारी याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबाराच्या प्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड रवि पुजारी याला मुंबई सत्र न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.

पोहरादेवी येथील गर्दीच्या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करा ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुख्यमंत्री एकीकडे ‘मास्क घाला’, असे आवाहन करतात. दुसरीकडे मात्र शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत, हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंद करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा

माघ द्वादशीलाही श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद रहाणार !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २४ फेब्रुवारी (माघ शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौरपदी विजयी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजयी झाले आहेत. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते, तर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली.

संजय राठोड यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप

सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘या सगळ्या बलात्कार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. ‘तू अधिक बोलतो कि मी’, हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला मुळीच साजेसे नाही.

बीड जिल्ह्यातील शंतनू मुळूक यांची टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांकडून चौकशी

टूलकिट प्रकरणी देहली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणार्‍या निकीता जेकब आणि बीड येथील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी २२ फेब्रुवारी या दिवशी दोघांचीही देहली पोलिसांनी चौकशी केली.