संजय राठोड यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत ! – सौ. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप

डावीकडून सौ. चित्रा वाघ, संजय राठोड

मुंबई – संजय राठोड हेच पूजा चव्हाण हिचे मारेकरी असून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केली आहे.

सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘या सगळ्या बलात्कार्‍यांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. ‘तू अधिक बोलतो कि मी’, हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला मुळीच साजेसे नाही. त्यामुळे सरकारने ‘महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण’ यांचे नारे बाजूला ठेवून कृती करणे आवश्यक आहे.

अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचे मंत्री, आमदार हे बलात्कार्‍याला वाचवण्यासाठी पुढे आले. त्यांची एकी महाराष्ट्राने पाहिली. भंडारा येथे ११ निष्पाप जिवांचा होरपळून मृत्यू झाल्यावर ४० दिवस गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्या वेळी ही एकी दिसली नाही.’’