
मुंबई – संजय राठोड हेच पूजा चव्हाण हिचे मारेकरी असून त्यांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी केली आहे.
सौ. चित्रा वाघ म्हणाल्या, ‘‘या सगळ्या बलात्कार्यांना पाठीशी घालण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. ‘तू अधिक बोलतो कि मी’, हे चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला मुळीच साजेसे नाही. त्यामुळे सरकारने ‘महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण’ यांचे नारे बाजूला ठेवून कृती करणे आवश्यक आहे.
अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचे मंत्री, आमदार हे बलात्कार्याला वाचवण्यासाठी पुढे आले. त्यांची एकी महाराष्ट्राने पाहिली. भंडारा येथे ११ निष्पाप जिवांचा होरपळून मृत्यू झाल्यावर ४० दिवस गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्या वेळी ही एकी दिसली नाही.’’
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम