भारताने घेतला होता आक्षेप !

बीजिंग (चीन) – तिबेटमधील यारलुंग त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीवर धरण बांधल्याने भारत किंवा बांगलादेशातून जाणशर्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट या प्रकल्पामुळे काही प्रमाणात आपत्ती टाळण्यास साहाय्य होणार आहे. चीनच्या या प्रकल्पामुळे सखल भागात हवामान पालट संतुलित होईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ याकुन यांनी सांगितले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ३ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत या धरणाबाबत आक्षेप नोंदवला होता. ‘ब्रह्मपुत्रेवर धरण बांधल्याने भारतातील राज्यांची हानी होऊ शकते’, असे भारताने म्हटले होते.
या धरणावर चीन अंदाजे १३७ अब्ज अमेरिकी डॉलर (सुमारे १२ लाख कोटी रुपये) खर्च करणार आहे. चीनला येथून प्रतिवर्षी ३०० अब्ज किलोवॅट-तास वीज निर्मिती करायची आहे.

भारताची ईशान्येकडील राज्ये आधीच वारंवार पूर येण्याच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्यांना हवामान पालटामुळे भूस्खलन, भूकंप आणि पूर इत्यादींसारख्या अधिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच या धरणाच्या बांधकामामुळे भारताची चिंता वाढली आहे.
संपादकीय भूमिकाविश्वासघातकी, धूर्त आणि भारतद्वेषी असणार्या चीनच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ? |
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प