Rohingya Infiltrators In Mumbai : भाईंदर येथे घुसखोर रोहिंग्यांची व्यवस्था करणार्‍यांचा शोध घ्यावा !

आमदार गीता जैन यांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

आमदार गीता जैन आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाईंदर येथे घुसखोर रोहिंगे सापडणे, हे महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीन धोकादायक आहे. भाईंदर येथे घुसखोर रोहिंग्यांच्या रहाण्याची व्यवस्था करणारे त्यांना येथे आणणारे कोण आहेत ? याचा शोध घ्यावा, अशी मागणी भाईंदर येथील आमदार श्रीमती गीता जैन यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याविषयी आमदार गीता जैन यांनी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणी भाईंदरमधील उत्तन येथे मुंबई पोलिसांनी ८ रोहिंग्या मुसलमानांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमली पदार्थ सिद्ध करण्यात येत असलेल्या जागांवर धाडीही घातल्या.