‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने १.६.२०२२ या दिवसांपासून सेवा करण्याचे परम भाग्य लाभले. मला प्रतिदिन रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात सकाळी होणार्या आरतीला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. नामजप एकाग्रतेने होणे
मी २ दिवस नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात बसलो होतो. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करून नामजप करत असतांना माझे मन एकाग्र झाले. गुरुदेवांच्या चरणपादुकांकडे माझे मन केंद्रित झाले.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील त्यांच्या आज्ञाचक्रातून तेजोमय कण निघत आहेत’, असे दिसणे
परात्पर गुरुमाऊलींच्या छायाचित्राच्या दिशेने माझे मन एकाग्र होत होते. मला सूक्ष्मातून दिसले, ‘परात्पर गुरुमाऊलींच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी हिर्यासारखा चमकणारा एक खडा आहे. तो खडा प्रकाशमय होऊन त्यातून तेजोमय कण बाहेर पडत आहेत. काही वेळाने त्या कणांनी परात्पर गुरु डॉक्टरांचा संपूर्ण चेहरा झाकला गेला आणि त्यांचे छायाचित्र पांढरे अन् प्रकाशमान झाले. परात्पर गुरुमाऊलींच्या चेहर्याच्या मागील बाजूने पुष्कळ प्रकाशझोत निघाला आणि तो प्रकाशझोत ध्यानमंदिरातील सर्व देवतांच्या चित्रांवर पसरला.’ मला असे दृश्य २ दिवस दिसत होते.
३. मला ध्यानमंदिरात गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.
४. मारुतिरायांची आरती म्हणतांना मला जाणवले, ‘वानरसेना हातात गदा घेऊन आश्रमाच्या सभोवताली भुभुःकार करत आहे.’
५. ‘प्रभु रामचंद्रांच्या समवेत हनुमानजी आणि त्यांचे सैन्य लढण्याच्या पवित्र्यात आहे’, असे दृश्य मला दिसले.
त्या दिवशी आरती अत्यंत भावपूर्ण झाली आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– श्री. जयवंत रसाळ, जयसिंगपूर (२७.६.२०२२)
|
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !