‘आपत्काळात वेदनांना तोंड कसे द्यायचे ?’, हे शिकवणारी एक आदर्श साधिका !

‘२०.५.२०२१ या दिवशी मध्यरात्री ३ वाजता माझ्या उजव्या दाढेत जोरात कळ येऊन मला जाग आली. तेव्हा माझ्या मनात वेदनाशामक गोळी घेण्याचा विचार आला; पण देवाने मला गोळी न घेता वेदना सहन करण्यास सांगितले. त्यामुळे मी वेदनांकडे दुर्लक्ष करत नामजप आणि भावप्रयोग करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे मध्यम स्वरूपातील वेदनेचे रूपांतर मंद वेदनेत झाले, तरीही त्या वेदना मला सहन होत नव्हत्या. अशा स्थितीत जवळजवळ १०-१५ मिनिटे गेल्यावर मी देवाला ‘आता मला वेदना सहन होत नाहीत’, असे सांगितले. तेव्हा देवाने मला मानस रूपात वेदनाशामक गोळी घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी वेदनाशामक गोळी घेण्याची मानस कृती केल्यावर ५ मिनिटांतच मला जणू खरंच वेदनाशामक गोळी घेतल्याप्रमाणे वेदना न्यून होऊन गाढ झोप लागली. त्यानंतर नेहमीप्रमाणे मी सकाळी ७ वाजताच जागी झाले. तेव्हाही मला मंद स्वरूपाच्या वेदना होतच होत्या; पण देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले. तेव्हा मला ‘आपत्काळात वेदना होत असतांना औषधे न मिळाल्यास माझी साधना कशी होणार ?’, याची काळजी वाटली. त्यामुळे आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवानेच मला मध्यरात्री ३ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, म्हणजे एकूण १३ घंटे वेदना सहन करण्याची शक्ती दिली. माझ्या आयुष्यात प्रथमच मी एवढे घंटे वेदना सहन केल्या असतील. मंद स्वरूपातील वेदना पूर्णपणे थांबण्यासाठी दुपारी ४ वाजता मात्र मी स्थुलातून वेदनाशामक गोळी घेतली.
या वेदनांमुळे मला होणारा आध्यात्मिक त्रासही वाढला. अशा स्थितीत वेदना सहन करणे, म्हणजे एक अग्निदिव्यच होते; पण ‘आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवानेच माझ्याकडून हा प्रयोग करवून घेऊन मला वेदना सहन करण्याची शक्ती दिली’, असे मला वाटले. या प्रसंगातून मला आपत्काळाची थोडीशी कल्पना आली; पण हा प्रयोग केवळ त्याच दिवशी केला. ’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, गोवा. (२०.१.२०२२)
आपत्काळात साधन-सामग्रीचा अभाव असतांना प्रसंगाला कशा प्रकारे तोंड द्यायचे, यासाठी साधिकेने केलेला हा व्यक्तीगत प्रयत्न आहे. – संपादक
|
स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत !
साधकांना आधार देणारे आणि उत्तम नेतृत्वगुण असलेले ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. नागेश गाडे (वय ५० वर्षे) !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !