
नाशिक – आम्हाला कारागृहात टाकायचे असेल, तर जरूर टाका. आम्ही आमचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश पाळणारच. ३ मेपर्यंत भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावली जाईल, अशी चेतावणी येथील मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी १९ एप्रिल या दिवशी दिली आहे.
मशिदींवरील भोंग्यावरून अजान दिली जात असल्याने राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतची समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील पोलीस आयुक्तांनी अनुमतीविना भोंगे वाजवण्यास सक्त मनाई केली असून विनाअनुमती भोंगे लावल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे; मात्र पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्याविषयी काढलेल्या आदेशाला मनसेने आव्हान दिले आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !