अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन याकडे लक्ष का देत नाही ?

कागल (जिल्हा कोल्हापूर), १० डिसेंबर (वार्ता.) – कागल तालुक्यात ४ साखर कारखाने कार्यरत असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू झाल्याने रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावणे, ओव्हरलोड, तसेच वेगमर्यादा, रिफ्लेक्टर, नेमप्लेट नसणे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. ट्रॅक्टर भरधाव वेगाने ऊस वाहतूक करत आहेत. त्यामुळे नेहमीच रस्त्यावर अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागत आहे. प्रतिवर्षी होणार्या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी मुरुगुड पोलीस ठाण्यात दिले आहे. या वेळी अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !