अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन याकडे लक्ष का देत नाही ?

कागल (जिल्हा कोल्हापूर), १० डिसेंबर (वार्ता.) – कागल तालुक्यात ४ साखर कारखाने कार्यरत असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम चालू झाल्याने रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. ऊस वाहतूक ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावणे, ओव्हरलोड, तसेच वेगमर्यादा, रिफ्लेक्टर, नेमप्लेट नसणे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. ट्रॅक्टर भरधाव वेगाने ऊस वाहतूक करत आहेत. त्यामुळे नेहमीच रस्त्यावर अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागत आहे. प्रतिवर्षी होणार्या रस्त्यावरील अपघातांपेक्षा ट्रॅक्टरमुळे अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हुल्लडबाज ट्रॅक्टर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी मुरुगुड पोलीस ठाण्यात दिले आहे. या वेळी अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद