
सोलापूर – भाजपच्या काळात तिन्ही वीज आस्थापनांचा कारभार उत्तम चालला होता, तसेच स्वस्त दरात वीज खरेदी केली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्नांचा खेळखंडोबा झाला आहे. विजेचा वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजदेयक वसुली केली जात आहे. कोरोना उपचारांसाठी असलेली रुग्णालये, तसेच वैद्यकीय देयकांचे प्रश्न सुटले नाहीत. याचा परिणाम पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दिसून येईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. २४ नोव्हेंबर या दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘हेरिटेज लॉन’ येथे भाजपच्या वतीने बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !