सोलापूर – भाजपच्या काळात तिन्ही वीज आस्थापनांचा कारभार उत्तम चालला होता, तसेच स्वस्त दरात वीज खरेदी केली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्नांचा खेळखंडोबा झाला आहे. विजेचा वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजदेयक वसुली केली जात आहे. कोरोना उपचारांसाठी असलेली रुग्णालये, तसेच वैद्यकीय देयकांचे प्रश्न सुटले नाहीत. याचा परिणाम पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दिसून येईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. २४ नोव्हेंबर या दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘हेरिटेज लॉन’ येथे भाजपच्या वतीने बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्नांचा खेळखंडोबा ! – देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्नांचा खेळखंडोबा ! – देवेंद्र फडणवीस
नूतन लेख
- आदि शंकराचार्यांनी भारताच्या भाषिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात एकात्मता दृढ केली ! – कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय
- T Raja Singh House Arrest : भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना पोलिसांनी घरातच केले नजरकैद !
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश