
सोलापूर – भाजपच्या काळात तिन्ही वीज आस्थापनांचा कारभार उत्तम चालला होता, तसेच स्वस्त दरात वीज खरेदी केली जात होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजेच्या प्रश्नांचा खेळखंडोबा झाला आहे. विजेचा वापर न करता सावकारी पद्धतीने जनतेकडून चौपट वीजदेयक वसुली केली जात आहे. कोरोना उपचारांसाठी असलेली रुग्णालये, तसेच वैद्यकीय देयकांचे प्रश्न सुटले नाहीत. याचा परिणाम पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दिसून येईल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. २४ नोव्हेंबर या दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘हेरिटेज लॉन’ येथे भाजपच्या वतीने बैठक आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !