|

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. ते लाँच पॅडवर गोळा झाले आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि सीमा सुरक्षा दल त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.
लाइन ऑफ कंट्रोल (LOC) आतंकवादियों द्वारा घुसपैठ की कोशिश लगातार जारी है. नियंत्रण रेखा पर इस वक्त 250- 300 से अधिक आतंकवादी भारत में घुसपैठ की फिराक में हैं. @BSF_India https://t.co/3F96JJbLmy
— Zee News (@ZeeNews) November 9, 2020
दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या बारामुला येथील नियंत्रणरेषेवर पाकने केलेल्या गोळीबारात भारताचे ५ सैनिक हुतात्मा, तर ४ नागरिक ठार झाले होते. तसेच १९ जण घायाळ झाले होते. हुतात्म्यांपैकी राजेश डोवल या अधिकार्याच्या अंत्यसंस्कारासाठी मिश्रा येथे आले होते. तेव्हा ते बोलत होते. भारतानेही पाकला दिलेल्या प्रत्युत्तरात त्याचे ११ सैनिक ठार झाले होते, तर काही बंकर्स नष्ट करण्यात आले होते.

पाकच्या गोळीबारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील पाकच्या दूतावासातील वरिष्ठ अधिकार्याला बोलावून त्याला खडसावले. त्याच वेळी पाकनेही त्याच्या देशातील भारतीय दूतावासातील अधिकार्याला बोलावून भारताने केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारावर आक्षेप नोंदवला. (‘चोर तो चोर, वर शिरजोर’, या वृत्तीचा पाक ! – संपादक)
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण