
कराड, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – मोदी शासनाने घाईगडबडीत ३ शेतकरी विरोधी विधेयके संसदेत संमत करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. ही विधेयके शेतकर्यांना गुलामगिरीत लोटणारी असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा लाभ होणार आहे, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
केंद्राचे कृषी विधेयक शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे : पृथ्वीराज चव्हाण#sarkarnama #sarkarnamanews @prithvrj
https://t.co/d2bLWCz496— Sarkarnama (@MySarkarnama) October 15, 2020
राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण यांनी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, केंद्रशासनाने किमान आपल्या मित्रपक्षांशी या विधेयकांविषयी चर्चा करायला हवी होती. मंत्रीमंडळ बैठकीतही याविषयी चर्चा केली नाही. वर्ष २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे केंद्रशासन शेतीमालाला हमीभावही देत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करण्याची मागणी आम्ही आज राज्यपालांकडे केली आहे.
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !