कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

(म्हणे) ‘मोदी सरकार संपूर्ण आशिया खंडाला संघर्षाच्या खाईत ढकलू शकते !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारत नाही, तर पाकने गेली ३ दशके दक्षिण आशिया खंडाला हिंसाचाराच्या गर्तेत ढकलेले आहे, ही वस्तूस्थिती आहे ! पाकचा नायनाट केल्याविना हे थांबणार नाही आणि ते मोदी सरकारने करावे, असेच भारतियांना वाटते !

अमेरिकेकडून पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबासह ८ आतंकवादी संघटना ‘विदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीत कायम !

अमेरिकेने लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटनेला ‘परदेशी आतंकवादी संघटने’च्या सूचीमध्ये कायम ठेवले आहे. तसेच पाकमधील ‘लष्कर-ए-झांग्वी आणि अन्य ६ जिहादी आतंकवादी संघटनांनाही  जागतिक आतंकवादी संघटनेच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये ! – सैन्यदलप्रमुख नरवणे यांची चीनला चेतावणी

भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्‍न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !

पाक आणि चीन यांचे एकत्र येणे भारतासाठी धोकादायक असले, तरी दोन्ही आघाड्यांवर आम्ही सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.

युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !

तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्‍या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय  शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

(म्हणे) ‘इस्लामी देशात मंदिरे असतील, तर ती फोडली पाहिजेत !

आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन ! भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

त्राल येथे आतंकवाद्यांच्या ग्रेनेड आक्रमणात ८ जण घायाळ

आतंकवाद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

पाकमधील हिंदु मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ३० धर्मांधांना अटक

घटनेच्या ३ दिवसानंतर केंद्र सरकारने विरोध नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने ‘पाकच्या अंतर्गत प्रश्‍नांत हस्तक्षेप नको’, असाही विचार केला असेल; मात्र हा अंतर्गत प्रश्‍न नाही, तर हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे !

वुहानचे वास्तव !

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचे अन्य देशांतील आकडे लाखांच्या घरात जात असतांना चीनमध्ये केवळ काही सहस्र नागरिकांचीच माहिती होती. याचे कारण आता लक्षात येत आहे की, ज्यांनी ही माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांची चीनने मुस्कटदाबी केली, त्यांचा छळ केला.