नववर्षाच्या वेळी सरकारी नियमांचे पालन होते कि नाही, हे पहाण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची १४ पथके सिद्ध

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षित वावर, तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे कि नाही, याची पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे.

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांविषयी केंद्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी ! – मुंबई उच्च न्यायालय

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांविषयी केंद्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याविषयी न्यायालयाने केंद्रशासनाच्या ॲटर्नी जनरल यांना नोटीस पाठवली आहे.

मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.

कोरोनाची नियमावली डावलून एल्गार परिषदेला अनुमती देता येईल का ? याचा विचार करता येईल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अनुमती देण्यापूर्वी या परिषदेतील चिथावणीखोर वक्तव्यांमुळे कोरेगाव भीमा दंगल झाली होती, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे जनतेला वाटते !

‘ऑनलाईन’ २० व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे २५ डिसेंबरला उद्घाटन !

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी २५ आणि २६ डिसेंबर या दिवशी २० व्या संमेलनाचे आयोजन केलेले असून या संमेलनाचा उद्घाटन सोहळा २५ डिसेंबर या दिवशी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची केंद्रीय पथकाकडून पहाणी

केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांच्या पथकाने येथे अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या क्षेत्राची २२ डिसेंबर या दिवशी पहाणी केली. या वेळी त्यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव आणि पेनूर येथे झालेल्या हानीक्षेत्राची पहाणी केली.

५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वीज वितरण आस्थापनाचे कनिष्ठ अभियंता अटकेत

विद्युत् जोडणीचे मीटर बसवल्याचे बक्षीस म्हणून ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना महाराष्ट्र राज्य विद्युत् महावितरण आस्थापनेचे कनिष्ठ अभियंता अमोल बाळासो कणसे आणि सरकारी ठेकेदार हारुण लाटकर यांना अटक केली आहे.

लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा ! – बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांची हातकणंगले पोलीस ठाण्यात मागणी

सहारानगर, रुई येथील लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर कठोर कारवाई करा, अशी मागणी बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भवड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित

ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रहित करण्यात आली आहे. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच कोरोनामुळे यात्रा रहित करावी लागली असून भाविकांनी ३० जानेवारीपर्यंत गर्दी न करता देवीला नेवैद्य अर्पण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्‍या श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा !

प्रत्येक धारकरी, शिवप्रेमी डोळ्यांत प्राण आणून धारातीर्थ यात्रेच्या दिनांकाची वाट पहात होता. अखेर २८ ते ३१ जानेवारी २०२१ या कालावधीत धारातीर्थ यात्रा होत असल्याचे घोषित झाल्यामुळे धारकरी मोहिमेच्या पूर्वसिद्धतेला लागले आहेत.