दळणवळण बंदी शिथिल होऊनही वीजदेयके न भरणारे ग्राहक कर्तव्यचुकारपणा करून संबंधितांना वीजपुरवठा खंडित करण्यासाठी भाग पाडतात. अशा कृतीमुळे महावितरणाच्या कामाची फलनिष्पत्ती न्यून होते, हे लक्षात घ्यायला हवे.

पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीजग्राहकांकडे वीजदेयकांची एकूण १ सहस्र ९६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी १ सहस्र २४७ कोटी रुपये थकबाकी असणार्या १४ लाख ग्राहकांनी १ एप्रिल २०२० पासून एकदाही वीजदेयक भरलेले नाही. यामध्ये औद्योगिक, वाणिज्यिक आणि घरगुती ग्राहकांचा समावेश आहे. अशा १४ लाख ग्राहकांनी तातडीने वीजदेयक भरले नाही, तर पुढील ३ आठवड्यांत त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !