कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नासनोडकरीण देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्यास स्थानिकांचा विरोध

‘कळंगुट येथे झालेल्या बैठकीत देवस्थानच्या जागेत मलनिःसारण प्रकल्प उभारण्याविषयी सर्वानुमते विरोध करण्यात आला. देवस्थानने आक्षेप घेऊनही शासनाने ही भूमी कह्यात घेतल्याचे देवस्थानच्या सदस्यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलसाठी सनबर्न आयोजकांकडून पुन्हा अर्ज दाखल

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हलच्या (सनबर्नच्या) आयोजकांनी २७ मार्चपासून ३ दिवस सनबर्न आयोजित करण्याविषयी अनुमती मागण्यासाठी पर्यटन खात्याकडे पुन्हा अर्ज केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटवले 

अज्ञातांकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे ऊस नोंदणी कार्यालय पेटवून दिले.

प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या अकोला आणि अमरावती महानगरपालिकांवर कारवाई कधी ? – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कारवाई न करणार्‍या अकोला आणि अमरावती या महानगरपालिकांविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी कारवाई करणार ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारला.

परभणी जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव झाल्याने ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार ! – सुनील केदार, पशूसंवर्धन मंत्री

शहरात ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू झाला आहे. यानंतर जिह्यातील ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांना याचा धोका असणार आहे – राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार

तीन वर्षे हिंदुत्वनिष्ठांनी विरोध केल्यानंतर सातारा नगरपालिका पुन्हा या वर्षी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सेवा पुरस्कार’ वितरणासाठी प्रयत्नशील

ज्यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि ज्यांच्या संस्थेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होतात, त्यांच्या नावाने नगरपालिकेला पुरस्कार का द्यावासा वाटतो ?

अभिनेता सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सोनू सूद यांच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.

लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर भोसरीत अदखलपात्र गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या वर्ष २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांविषयी दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इतिहासात प्रथमच नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडेरायाची यात्रा रहित

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील खंडेरायाची यात्रा कोरोनामुळे इतिहासात प्रथमच रहित करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्‍यांना प्रदर्शन न लावण्याचे आदेश दिले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन पास’ची सक्ती रहित करण्यात आली असून आता ‘पास’विना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.