स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

नोएडा (उत्तरप्रदेश) हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्‍यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !

पूर्वजांंनी राखलेल्या भूमी आमच्याच, सरकारच्या नाहीत ! – सत्तरीतील लोकांचा दावा

विश्‍वजित राणे यांनी सत्तरीतील लोकांची दिशाभूल केली. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी व्यासपिठावर येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे आव्हान या वेळी सत्तरी तालुक्यातील नागरिक आणि अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी विश्‍वजित राणे यांना दिले.

आमदार केसरकर यांच्या आश्‍वासनानंतर रवि जाधव यांचे उपोषण मागे

नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते.

म्हापसा येथील श्री बोडगेश्‍वरदेवाचा आज जत्रोत्सव

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर हे तर भक्तवत्सल अन् सत्वर हाकेला धावणारे जागृत दैवत. २७ जानेवारीला या देवतेचा ६वा जत्रोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने या देवतेविषयी थोडक्यात माहिती देत आहोत.

अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना अनेकदा पैसे दिल्याचा पुरवणी आरोपपत्रात पोलिसांचा दावा

पोलिसांना दिलेल्या जबाबात दासगुप्ता यांनी सांगितले, ‘‘रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकचे रेटींग मिळावे, यासाठी मी माझ्या टीमसमवेत काम करायचो आणि टी.आर्.पी.मध्ये फेरफार करायचो.

(म्हणे) ‘महापालिकेसमोरील लाल-पिवळा ध्वज हटवला, तर रक्तपात होईल !’ – नागराज वाटाळ, कन्नड संघटना

देशात आपण कायद्याचे राज्य आहे, असे एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे नागराज वाटाळ यांच्यासारखे थेट कायदा हातात घेण्याची भाषा करतात ! समाजात फूट पाडणारी अशाप्रकारे वक्तव्ये करणार्‍यांवर प्रशासनाने योग्य वेळी कारवाई करणे आवश्यक आहे !

विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे ! – प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर

नाशिक येथे होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत नारळीकर यांनी दूरचित्र संवादाद्वारे मनोगत व्यक्त केले. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले पाहिजे; पण आपणच मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यास भाग पाडतो.

पोलिसांच्या अनुमतीनंतर ३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन

कोरेगाव भीमा येथील या हिंसाचाराला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते; मात्र आता ३ वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती दिल्यामुळे आता ही परिषद होत आहे.   

येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला !

येस बँकेत झालेल्या घोटाळाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले या बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी या दिवशी फेटाळून लावला आहे.