लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी नगर येथे निवेदन

केंद्र सरकारने देशात लव्ह जिहाद रोखण्यासाठी ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी. लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी केंद्र अन् राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा गठीत करावी. लव्ह जिहादच्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेंच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ जारी !

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांच्या विरोधात पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

‘सरकार स्थिर रहावे’, असे वाटत असल्यास काँग्रेस नेतृत्वावर बोलणे टाळावे ! – अधिवक्त्या यशोमती ठाकूर, महिला आणि बाल विकासमंत्री

काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असे सूचक ‘ट्वीट’ काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

सातारा येथे अतिक्रमण विभागाची कारवाई

काही अतिक्रमणे सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ४ डिसेंबर या दिवशी हटवली.

हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने तालुकास्तरीय किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोठ्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजगड) आणि विश्‍वजीत पाटील (राजगड) यांना देण्यात आले.

रणजित डिसले यांची राज्यपाल नियुक्त जागेवर शिफारस करणार ! – प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

रणजित डिसले यांची विधान परिषदेच्या १२ जागांपैकी एका जागेसाठी शिफारस करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा अशी कामगिरी डिसले यांची आहे. राज्याच्या विधीमंडळात डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहे.’’

जिल्हा पंचायत निवडणूक १२ डिसेंबरला, तर मतमोजणी १४ डिसेंबरला

राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक शनिवार, १२ डिसेंबर, तर मतमोजणी १४ डिसेंबर या दिवशी होणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

वीजदेयकांच्या अडचणींविषयी वीजवितरणचे अधिकारी वीजग्राहकांच्या भेटीला

कणकवली आणि मालवण परिसरातील वीजग्राहकांना वीजदेयकांविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाचे (महावितरणचे) अधिकारी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत उपस्थित रहाणार आहेत

कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सवास १७ डिसेंबरपासून प्रारंभ

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ७ वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वन्यजिवांचा प्रामुख्याने वाघांचा ‘कॉरिडॉर’ असलेल्या  कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी ते आंबोलीपर्यंतचा सलग एकूण ८६ सहस्र ५५४ हेक्टरच्या वनक्षेत्राला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण मिळणार आहे.