गिरगाव चौपाटी परिसरातील वडाचे झाड तोडणार्‍यांवर कठोर कारवाई करावी ! – पर्यावरणप्रेमी नागरिकांची मागणी 

गिरगाव चौपाटी भागातील तांबे चौकातील सिग्नलला लागून असलेले वडाचे झाड ३ फेब्रुवारीच्या पहाटे कापण्यास आरंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत हे झाड पूर्णपणे कापण्यात आले. याविषयी पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या रुग्णावर उपचाराचे निर्बंध शिथिल करण्यासाठी खासगी रुग्णालयांची याचिका

कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने काही जिल्ह्यांतील खासगी रुग्णालयांवरील खाटा राखीव ठेवण्यासह उपचाराच्या दरांचे बंधन शिथिल करण्याची मागणी रुग्णालयांनी केली आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि काही खासगी रुग्णालये यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली.

राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास शासनाची अनुमती

राज्यातील ऊस गाळप हंगामाचे कारण पुढे करत ३ मासांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती राज्य सरकारने २ फेब्रुवारीला मागे घेतली आहे.

यवतमाळ जिल्हा विधीसेवा प्राधिकरण याच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा !

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सत्र न्यायालय येथील सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला.

नाशिक येथील साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी

आगामी साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने भगूर येथे त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

पुण्यात स्थानिकांच्या साहाय्याने गुन्हे करणारी नायजेरियन टोळी अटकेत

सामाजिक संकेतस्थळावर मित्र होण्यासाठीची मागणी पाठवून नंतर खरेदीच्या निमित्ताने फसवणूक करणार्‍या एका नायजेरियन टोळीला नगरच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्याच्या पथकाने पुण्यात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले.

उंचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करा ! – करवीर शिवसेना

उंचगाव हे करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून  गावात येणारा उंचगाव कमानीपासूनचा प्रमुख मार्ग असलेल्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात.

धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या पत्नीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये स्वत:च्या २ मुलांना मुंडे यांनी शासकीय चित्रकूट बंगल्यामध्ये डांबून ठेवले असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायले !

३ फेब्रुवारी या दिवशी येथील महापालिकेच्या एका बैठकीत महापालिकेचे शिक्षणाचे अंदाजपत्रक सादर करत असतांना सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून ‘सॅनिटायझर’ प्यायले. पाण्याची बाटली समजून त्यांनी ‘सॅनिटायझर’ची बाटली घेतली.