सभागृहात वाद घालणारे नकोत, तर वाद सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !

मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवूनही अद्याप त्या नावांना संमती देण्यात आलेली नाही. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘राज्यपालनियुक्त सदस्यांना संमती देऊन लोकशाही जिवंत ठेवावी’, असा टोला विरोधकांना लगावला. यावरून विधानसभेत गोंधळ निर्माण झाला.
अनिल परब यांच्या विधानावर सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यपालांचे निर्णय पक्ष ठरवतो का ?’, अशी विचारणा अनिल परब यांना केली. विविध शासनमान्य समित्यांमध्ये सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही विरोधकांनी या वेळी केली. त्यावरून सभागृहात हा वाद निर्माण झाला. या वेळी सभागृहाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हस्तक्षेप करून वाद थांबवला.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक