सभागृहात वाद घालणारे नकोत, तर वाद सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत !

मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठवूनही अद्याप त्या नावांना संमती देण्यात आलेली नाही. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ‘राज्यपालनियुक्त सदस्यांना संमती देऊन लोकशाही जिवंत ठेवावी’, असा टोला विरोधकांना लगावला. यावरून विधानसभेत गोंधळ निर्माण झाला.
अनिल परब यांच्या विधानावर सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यपालांचे निर्णय पक्ष ठरवतो का ?’, अशी विचारणा अनिल परब यांना केली. विविध शासनमान्य समित्यांमध्ये सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही विरोधकांनी या वेळी केली. त्यावरून सभागृहात हा वाद निर्माण झाला. या वेळी सभागृहाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हस्तक्षेप करून वाद थांबवला.
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
आषाढी यात्रा कालावधीत आजपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था !
आषाढी वारी मार्गावर महाअन्नदान सेवेत सहभागासाठी आवाहन !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)