साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्‌मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’

गुरुदेवांसाठी सुमनांजली !

‘गुरुदेव, आपण सगुण आहात; कारण सगुणात वावरतांना दिसता म्हणून; पण आपणाला गुण स्पर्शतच नाही. माया स्पर्शूच शकत नाही.

शास्त्रदृष्टी बाळगून सनातन परंपराचा अभ्यास करा !

सनातन विचारप्रणालीवर सत्तेच्या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो. ते खरे सार आहे. खरा जिवंतपणा आहे. त्यामुळेच ते अनेक प्रकारच्या दिव्यातून टिकेल. आज ना उद्या सर्व राष्ट्रास शिरोधार्य वाटेलच.

भगवंताचे दर्शन

भगवंताचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि चरण म्हणजे शूद्र. ब्राह्मण दिसला की, परमात्म्याच्या मुखाचे दर्शन करत प्रसन्न होत.

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकणे महत्त्वाचे !

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकवणे, हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.