सद्गुरूंविना परमार्थ साधता येत नाही !
‘परमार्थ साधण्यात आई-वडील, व्याही, जावई इत्यादीही साहाय्य करत नाहीत. मनुष्याने स्वतःच स्वतःसाठी साहाय्य शोधले पाहिजे. परमार्थाच्या प्राप्तीत समर्थ सद्गुरुच साहाय्य करण्यात सक्षम आहेत.
‘परमार्थ साधण्यात आई-वडील, व्याही, जावई इत्यादीही साहाय्य करत नाहीत. मनुष्याने स्वतःच स्वतःसाठी साहाय्य शोधले पाहिजे. परमार्थाच्या प्राप्तीत समर्थ सद्गुरुच साहाय्य करण्यात सक्षम आहेत.
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवणार्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या षड्यंत्राला बळी न पडता जोमाने स्वतःची साधना वाढवा !’
‘तुम्हाला शरीर सुदृढ ठेवायला शिकावे लागेल आणि इतरांनाही शिकवावे लागेल. शारीरिक श्रम करत जा. शरीर आणि मन या दोन्हींचा विकास एकाच वेळी व्हायला हवा..
‘साधकांनो, ‘साक्षात् परमेश्वरस्वरूप अशा श्री गुरूंच्या छत्रछायेखाली असणार्या प्रत्येक साधकाचे जीवन हे निश्चितच सामान्य न रहाता दैवी अन् सुवर्णमय होणार आहे’, यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्या स्वर्णिम क्षणांची प्रत्यक्ष अनुभूती घ्या !’
‘आपण जे दुःख भोगतो, त्याचा बराचसा भाग आपण खात असलेल्या अन्नामुळे उद्भवत असतो. आपल्याला असे आढळून येते की, जड अन्नाचे वाजवीपेक्षा अधिक जेवण झाल्यावर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते.
‘तुझे आहे तुजपाशी’ या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्या साधकांना परत परत सांगू इच्छितो.’
जर डोक्यावरील केस कापल्यावर ईश्वरप्राप्ती होत असेल, तर प्रत्येकाने आपल्या डोक्यावरील केस कापले असते; परंतु संपूर्ण अंगावरील केस (लोकर) पुनःपुन्हा कापल्यानंतरही कोणतीच मेंढी आजतागायत स्वर्गात गेल्याची नोंद नाही.
हे खरे आहे की, या जगात जगण्याकरता धन पैशाची आवश्यकता आहे. त्या वाचून कुणी राहू शकणार नाही; पण हे जरी खरे असले, तरी आवश्यकतेपेक्षा त्याला अधिक महत्त्व देऊ नका.
‘अवतारी गुरु असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी रूप अन् कार्य यांची कीर्ती केवळ दाही दिशांनाच नव्हे, तर अगदी सप्तलोक अन् सप्तपाताळ येथपर्यंत पोचणार आहे’, हे त्रिकालाबाधित सत्य आहे !’
समाधान, आनंद, सुख ही मानसिक अवस्था आहे. ते आपण किती बाह्य गोष्टींची साठवण किंवा संग्रह केला यांवर अवलंबून नाही. एखाद्या व्यक्तीकडे सर्व जगाचे स्वामित्व असले, तरी तो असमाधानी असू शकेल.