ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न  होतो आणि भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढवण्याचा संकल्प करा ! 

ज्या कर्मांनी अंतरात्मा संतुष्ट होतो, ज्या कर्मांकरिता शास्त्र सहमत होते, ज्या कर्मांकरिता सद्गुरु सहमत होतात आणि ज्या कर्मांनी आपला अंतरात्मा प्रसन्न होतो, तसेच भगवंत प्रसन्न होतो, अशी कर्मे वाढविण्याचा संकल्प करा !

आपल्याला सावध करतील आणि हक्काने रागावून सुधारतील, अशा संतांच्या चरणी जायला हवे !

‘तुम्ही महान बनावे’, या हेतूने सत्य ऐकवून ते परमात्म्याकडे आकर्षित करणारे आणि ईश्वराच्या साक्षात्काराच्या मार्गावर घेऊन जाणारे महापुरुष तर विरळाच असतात. अशा महापुरुषांची संगत आदराने आणि प्रयत्नपूर्वक केली पाहिजे.

अनुग्रह

अध्यात्मात शारीरिक तथा मानसिक दोन्ही स्वरूपांचे बळ आवश्यक आहे. बळाखेरीज उभारी आणि जिद्द निर्माण होत नाही. तेच कार्य सद्गुरु आपल्या शिष्याविषयी स्वतःचे बळ देऊन करत असतात.

नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !

‘सशस्त्र लोकांशी निःशस्त्र लोकांनी शत्रुत्व करता कामा नये. अपराधी माणसाने आपले रहस्य जाणणार्‍याशी शत्रुत्व करता कामा नये.

सुवचने

‘आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंविना अन्य कुणावरही अतीविश्वास ठेवू नका आणि अतीसंशयही घेऊ नका.’ ‘आपल्यापेक्षा लहानांना भेटाल, तेव्हा करुणा ठेवा. आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तींना भेटाल, तेव्हा हृदयात आदर ठेवा.’

एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !

‘साधनेमध्ये ‘व्यष्टी साधना’ (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना) आणि ‘समष्टी साधना’ (समाजाच्या उद्धारासाठी करावयाची साधना) असे दोन प्रकार असतात…

‘ज्या आत्म्यात परिवर्तन होत नाही, तो परमात्याचा अंश मी आहे’, असे चिंतन करणारा साधक बंधनातून मुक्त होणे

मी परमात्म्याचा सनातन अंश आहे’, असे चिंतन करणारा साधक संसारात त्वरित निर्लेपभावास, निर्लेपपदास प्राप्त होतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक असे प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण करणे आणि आता ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या विषयावर लिखाण करणे

समाजातील सर्वसाधारण व्यक्तीही साधक व्हावी, तिने साधनेकडे वळावे यासाठी ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या संदर्भातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदशक लिखाण.

अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !

केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.