सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’

शहाड (जिल्हा ठाणे) परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन आस्थापनात स्फोट

उल्हासनगर येथील शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन या आस्थापनात नायट्रोजन टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला, तर २ जण हरवले आहेत.

नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्‍यू

धुळे येथील ४ प्रवासी कारमधून नाशिकहून धुळ्‍याकडे चालले होते. अपघात घडल्‍यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्‍थळी आले. अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्‍प झाला होता. अन्‍य मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ बसला अपघात

मुंबईहून राजापूरकडे निघालेल्‍या एस्.टी. बसला हा अपघात झाला आहे. गणेशोत्‍सवासाठी मुंबईहून नागरिक गावी निघाले होते. अपघातात बसच्‍या पुढच्‍या भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

चीनची आण्विक पाणबुडी बुडाल्याची चर्चा !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू गेल्या २ आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. ऑगस्ट मासामध्ये चीनची आण्विक पाणबुडी तैवान येथील समुद्रात झालेल्या अपघातात बुडाली. यात १०० नौसैनिक होते. त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई विमानतळावर खासगी विमानाला अपघात !

मुंबई विमानतळावर उतरणार्‍या ‘व्‍ही.एस्.आर्. व्‍हेंचर्स लेअरजेट ४५’ या खासगी विमानाला १४ सप्‍टेंबर या दिवशी अपघात झाला. उतरत असतांना विमान धावपट्टीवर कोसळले. हा अपघात एवढा मोठा होता की, विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी नौका उलटली : १८ विद्यार्थी बेपत्ता !

नौकेमध्ये किती जण बसायला हवेत ? आणि प्रत्यक्षात किती बसवले जात आहेत ?, याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही का ? आज अशी घटना घडत असेल, तर पुढेही याच कारणामुळे अशी घटना घडू शकते, असा सर्वसामान्य विचार प्रशासन करत नाही का ?

वायुगळतीची ३९ वर्षे !

भारताला लुटून मेहुल चोक्‍सी, नीरव मोदी पसार झाले. ते परदेशात ऐषोरामात जगत आहेत. त्‍यांच्‍या मुसक्‍या आवळून त्‍यांना परत आणू न शकणारी व्‍यवस्‍था अँडरसन याच्‍या वंशजांना भारतात आणून त्‍यांच्‍याकडून अँडरसन याने केलेल्‍या पापाचे प्रायश्‍चित्त घेण्‍यास त्‍यांना भाग पाडणार का ? सद्य:स्‍थिती पहाता या प्रश्‍नाचे उत्तर नकारात्‍मकच आहे.

अमेरिकेतील १२ खासदारांकडून ‘डाऊ केमिकल’ आस्थापनेवर कारवाईची मागणी

भोपाळ वायू दुर्घटनेचे सूत्र अमेरिकेत पुन्हा उपस्थित !

वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद

भिवंडी येथील वाडा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जातांना तोल जाऊन पडल्याने आकाश जाधव (वय २२ वर्षे) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता.