बालकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र बाल अधिकार कक्षाची स्थापना !

लहान मुलांच्या खिशात मुलांचे नाव, वडिलांचे नाव, संपूर्ण पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती ठेवावी, म्हणजे आपत्काळात मुलांना साहाय्य करणे सुलभ होईल.

Mahakumbh Punya Kshetra Yatra : प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष यात्रेचे आयोजन !

प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्‍या महाकुंभपर्वानिमित्त रेल्वे विभागाने भाविकांना प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी ‘महाकुंभ पुण्य क्षेत्र यात्रा’ नावाच्या विशेष यात्रेचे आयोजन केले आहे.

Vande Bharat Express : ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ पनवेलऐवजी कल्याणच्या दिशेने गेली !

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मडगावपर्यंत जाणारे ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ दिवा रेल्वेस्थानकावरून पनवेलला न जाता कल्याणच्या दिशेने पुढे गेली. चूक लक्षात आल्यावर तिला कल्याण रेल्वेस्थानकात आणण्यात आले.

भूमीपूजनाला १० वर्षे होत आली, तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या कामाला प्रारंभ नाही !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०१५ मध्ये कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी रोड स्थानकाच्या ठिकाणी ‘रेल्वे टर्मिनस’ बांधण्यासाठी भूमीपूजन केले होते.

कोकण रेल्वे स्थानकांची देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरण यांसह अन्य कामांसाठी अनुदान द्या !

कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरण करण्यासाठी, कोळी बांधवाना अनुदान देण्यासाठी, तसेच मुंबई पोलीस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्यासाठी  केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी उपलब्ध करून द्यावा

जेऊर (तालुका करमाळा) येथे हुतात्मा-उद्यान एक्सप्रेसला थांबा द्या ! – प्रवासी संघटनेची मागणी

या प्रसंगी जेऊर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वेस्थानक हे महत्त्वाचे स्थानक असून ‘अमृत भारत योजने’मध्ये जेऊर स्थानकाचे नाव आहे.

Dadar Hanuman Temple Demolition Issue : दादर येथील श्री हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिसीला रेल्वेची स्थगिती !

रेल्वे मंडळाने दादरचे ८० वर्षे जुने असणारे श्री हनुमान मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला रेल्वेकडूनच स्थगिती देण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पुढाकार घ्यावा ! – कोकण विकास समिती

कर्नाटक राज्यातील खासदारांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाचा भाग असलेला बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी २,७८२ कोटींचा खर्च अंदाजित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या अल्प होईल.