पुणे शहरातील रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष केल्‍याची याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट !

पुणे महानगरपालिकेच्‍या विरोधात शहरातील रस्‍त्‍यांची देखभाल, दुरुस्‍ती आणि शास्‍त्रीय पद्धतीने योग्‍य बांधकाम करण्‍यात दुर्लक्ष केल्‍याचा आरोप करत कनीज ए फातेमाह सुखरानी आणि पुष्‍कर कुलकर्णी यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयामध्‍ये जनहित याचिका प्रविष्‍ट केली आहे.

खडकवासला धरणातील प्रदूषण रोखणे आणि चौपाटी परिसरातील गर्दीचे नियोजन करणे यांसाठी संयुक्त पहाणी !

लाखो पुणेकरांची तहान भागवणार्‍या खडकवासला धरणाच्या पाण्यात सहस्रो पर्यटक उतरून पाण्याचे प्रदूषण करत असतात, तसेच येथील चौपाटी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीही होत असते.

नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे आवश्यक ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

इंद्रायणीतील प्रदूषण रोखण्‍यासाठी ‘इंद्रायणी सेवा फाउंडेशन’चे आळंदीत साखळी उपोषण !

इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पात्रातील प्रदूषण रोखण्‍यासाठी, तसेच ते करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्‍यासाठी येथील संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या समाधी मंदिरासमोर महाद्वारात साखळी उपोषण चालू केले आहे.

पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही ! – संशोधन

सध्या वापरात असलेली ३ लाख ५० सहस्रांहून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित !

‘नमामि गोदा’ प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा मानस !

गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पाचा मोठा वाटा असणार आहे. यातून गोदावरी नदीत जाणारे दूषित पाणी रोखले जाणार आहे. वाराणसी येथील गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेला प्रकल्प नाशिक येथे राबवला जाणार आहे.

बेंगळुरूतील ‘रमजान फूड मेळा’ रहित करा ! – नागरिकांची मागणी

सर्वसामान्यांना त्रास होणार्‍या गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन स्वतःहून त्यावर कारवाई का करत नाहीत ?

खडकवासला धरणाच्या पाण्यात अस्थी विसर्जन !

लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणार्‍यांवर तातडीने कारवाई केली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजीही घ्यायला हवी.

सर्वाधिक प्रदूषित नदीपात्रे महाराष्ट्रात !

केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होऊनही त्याचा वापर नदीपात्रांचे प्रदूषण अल्प करण्यासाठी न होणे संतापजनक !

गेल्या ३ मासांत पणजी शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ

रस्त्याचे बांधकाम चालू असणे, इमारती पाडण्याचे काम चालू असणे, आगीचा धूर, वाहनांतून सोडण्यात येत असलेली प्रदूषित हवा आदी कारणांमुळे ‘पी.एम्.१०’ची मात्रा वाढली आहे.