खासदारांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह !

लोकसभेत जर प्रश्न विचारण्यासाठीही पैसे घेतले जात असतील, तर तसे करणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायलाच हवी. अशांना जर शिक्षा झाली, तरच ज्याला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ म्हणतो, त्या संसदेची विश्वासार्हता टिकून राहील !

तुर्कीयेच्या संसदेजवळ आत्मघाती बाँबस्फोट : २ आतंकवादी ठार

अंकरा येथे संसदेजवळ १ ऑक्टोबरला सकाळी आत्मघाती बाँबस्फोट घडवण्यात आला. यात बाँबस्फोट घडवणारा आतंकवादी ठार झाला, तर दुसर्‍या आतंकवाद्याला सुरक्षादलांनी गोळ्या घालून ठार मारले.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत नाझी सैन्याधिकार्‍याचा टाळ्या वाजवून केला सन्मान !

‘नाझी, खलिस्तानी, गुंड आदींचे समर्थन करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे जगातील एकमेव पंतप्रधान म्हणजे जस्टिन ट्रुडो’, अशीच यापुढे त्यांची ओळख निर्माण होईल !

इराणमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास

इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणार्‍या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणार्‍या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संमत केले.

राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवाद’ शब्द हटवले ! – काँग्रेसचा दावा

नव्या संसदेच्या दुसर्‍या दिवशीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी सदस्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्यात आल्या. या प्रतींमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.

खासदारांनी घेतला जुन्या संसदेचा निरोप !

जुन्या संसद भवनातून नव्या संसद भवनामध्ये जाण्यापूर्वी सर्व खासदारांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एकत्र येऊन निरोप घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खासदारांना संसद भवनाच्या नव्या इमारतीत घेऊन गेले.

पंतप्रधान १७ सप्टेंबरला नवीन संसदेवर राष्ट्रध्वज फडकावणार !

१७ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनावर राष्ट्रध्वज फडकावतील. या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आणि विश्‍वकर्मा जयंतीही आहे.

सदस्यांच्या वागण्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवण्यास नकार ! – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

अशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्‍या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्‍या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

विरोधकांचा केंद्र सरकारविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला !

मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये २६ जुलै या दिवशीही केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारून ‘चर्चेचा दिनांक नंतर निश्‍चित केला जाईल’, असे सांगितले.