भारतीय चित्रपटसृष्टीचा उद्देशच हरपला आहे !
चित्रपटसृष्टीमध्ये समाजप्रबोधनाची अचाट शक्ती आहे; परंतु ती मानसिकता बाळगणारे दिग्दर्शक आणि निर्माते तुरळकच असतात. चित्रपट हे भारतियांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून उमेद निर्मिती आणि मार्गदर्शन यांचे साधन आहे, याचे भान सिनेसृष्टीने बाळगणे आवश्यक आहे.