संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्‍या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !

तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

हा तर अमृतकाळातील पूर्वरंगाचा प्रसाद ! – विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप

भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर केले.

Shivaji Maharaj : शिवरायांच्या काळातील समुद्री सामर्थ्य आपल्याला परत मिळवायचे आहे ! – पंतप्रधान मोदी

एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले.

Navy Day : नौदलातील सैनिकांची सेवा आणि बलीदान यांसाठी आम्ही सदैव कृतज्ञ राहू !

नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबरच्या सकाळी भारतीय नौदलातील सर्व सैनिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Navy Day : नौदलातील पदांची नावे भारतीय परंपरांनुसार करणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

आता यावरून कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, साम्यवादी आणि  पुरो(अधो)गामी कंपूने भारतीय नौदलाचे भगवेकरण होत असल्याची आवई उठवण्यास आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

Shivaji Maharaj : पंतप्रधानांच्या हस्ते राजकोट येथे शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण !

मालवण येथील समुद्रकिनार्‍यावर असलेल्या राजकोट या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या ४५ फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

Indian Navy Day 2023 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णक्षण !

भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलदिन सोहळा नौदलाच्या तळापासून अन्य ठिकाणी साजरा होत आहे. याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून जिल्ह्यासाठी हा सोहळा सुवर्णक्षण ठरणार आहे !

संपादकीय : निकालाचा मतीतार्थ !

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या दिशेने पडलेले आणखी एक पाऊल आहे. २ राज्यांमध्ये जनतेने झिडकारल्याने सत्ता गमावणारी काँग्रेस या पराभवानंतर आत्मपरीक्षण करील का ? या निकालांद्वारे सामान्य लोकांनी त्यांना काय हवे आहे’, याविषयी मतपेटीद्वारे संदेश दिला आहे.

जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. देशासाठी भाजपने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यांमुळे भाजपप्रणीत ‘एन्.डी.ए.’ला ३ राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.