हा तर अमृतकाळातील पूर्वरंगाचा प्रसाद ! – विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप

विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप

मुंबई – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयावर आपले नाव निर्विवादपणे कोरले आहे. देशभरातील मतदारांनी मोदीजींच्या नेतृत्वावर उमटवलेली पसंतीची मोहोरही या विजयातून ठळक झाली आहे. प्रत्येक जागतिक मंचावर मोदीजींनी भारताची प्रतिष्ठा उंचावली, भारताच्या संस्कृती आणि परंपरेची नवतेशी घातलेली अनोखी सांगड आणि जगाला त्याची ओळख करून देत संस्कृतीची शान उंचावण्याचा निरपेक्ष प्रयत्न केला आहे. यांमुळे भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर केले.