मुंबई – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयावर आपले नाव निर्विवादपणे कोरले आहे. देशभरातील मतदारांनी मोदीजींच्या नेतृत्वावर उमटवलेली पसंतीची मोहोरही या विजयातून ठळक झाली आहे. प्रत्येक जागतिक मंचावर मोदीजींनी भारताची प्रतिष्ठा उंचावली, भारताच्या संस्कृती आणि परंपरेची नवतेशी घातलेली अनोखी सांगड आणि जगाला त्याची ओळख करून देत संस्कृतीची शान उंचावण्याचा निरपेक्ष प्रयत्न केला आहे. यांमुळे भारताच्या जनतेस गेल्या पंचाहत्तर वर्षांत प्रथमच भाजपच्या सत्ताकाळातील अमृतकाळाची अनुभूती येत आहे, असे प्रतिपादन भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विजयाच्या पार्श्वभूमीवर केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > हा तर अमृतकाळातील पूर्वरंगाचा प्रसाद ! – विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप
हा तर अमृतकाळातील पूर्वरंगाचा प्रसाद ! – विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप
नूतन लेख
- पूर्वीचा वित्त आयोगाचा निधी न वापरल्याने ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाटीसाठी यंदा निधी नाही
- कदंब महामंडळाच्या १६ कर्मचार्यांवर वन खात्याकडून गुन्हा नोंद
- ऑनलाईन औषधाची विक्री करणार्या आस्थापनाकडून ग्राहकाला मिळणार १ लाख रुपयांची हानीभरपाई !
- मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची पुनश्च टीका !
- Goa Primary Schools : यापूर्वीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळेच गोव्यात मातृभाषेतील सरकारी प्राथमिक शाळांना अवकळा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
- १९ मे या दिवशी ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ सांगलीत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मोर्चा !