शासकीय पशू-मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापिठाच्‍या कार्यकारिणीत गोसेवा आयोगाच्‍या प्रतिनिधीची नियुक्‍ती होणार !

२० जुलै या दिवशी महाराष्‍ट्र पशू आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्‍ये सुधारणा करून शासनाने ही नियुक्‍ती घोषित केली.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेच्या चौकशीच्या विलंबावरून विरोधक आक्रमक !

‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’ – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

दुर्गम भागामुळे बचाव पथकाचे काम अधिक वेळ चालेल ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुर्घटनेत २५ ते २८ जण बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ७० नागरिक सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. २१ जण घायाळ असून त्यांतील १७ जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार चालू आहेत, तर ६ जणांना पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार चालू आहे. आतापर्यंत १० लोकांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.

#Exclusive : वारंवार दुर्घटना घडूनही कोकणात ‘एन्.डी.आर्.एफ्.’ला मान्यता नाही !

कोकणात ‘आपत्ती प्रतिसाद दल’ कधी स्थापन होणार ?

राज्‍यातून बेपत्ता होणार्‍या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्‍ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्‍याची माहिती सभागृहात दिली.

ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलिसांकडून १६ लाख ८८ सहस्र रुपये थकीत ‘ई-चलन’च्‍या दंडाची वसुली !

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्‍त तिरुपती काकडे यांनी ई-चलनच्‍या थकबाकीची वसुली करण्‍यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्‍यानुसार ही कार्यवाही चालू आहे.

मोगरा नाल्‍यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

बांधकाम व्‍यावसायिकांसाठी अनेक ठिकाणी नाल्‍याचे वळण पालटणे, त्‍यावर अनधिकृत बांधकामे करणे, नाल्‍याची रुंदी न्‍यून करणे आदी प्रयत्न केले जात असल्‍याचे उपप्रश्‍नांतून आमदारांनी सभागृहाच्‍या निदर्शनास आणून दिले.

महाराष्‍ट्रात एस्.टी.चे वर्षातील ३६५ दिवसांत ३०५ अपघात !

सदस्‍यांच्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना मंत्री दादा भुसे म्‍हणाले की, वर्ष २०१७-१८ मध्‍ये शिवशाही बस चालू करण्‍यात आली होती. एस्.टी. महामंडळाच्‍या ९०० बसगाड्या आहेत. भाडे तत्त्वावर २०५ बसगाड्या आहेत

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्‍या भाषणांवर निर्बंध आहेत.

‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे,