‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेचे प्रकरण

मुंबई, २० जुलै (वार्ता.) – नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीला अहवाल सादर करण्यासाठी १ मासाचा कालावधी देण्यात आला होता. चौकशीविषयी तारांकित प्रश्न उपस्थित करून २० जुलै या दिवशी विरोधकांनी चौकशीच्या मुदतवाढीवर आक्षेप घेतला. सत्ताधारी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

या तारांकित प्रश्नाला सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी ‘चौकशी आयोगाला ३ मास झाले आहेत. आणखी मुदतवाढ कशाला ? मुदतवाढ करून हे प्रकरण गुंडाळू इच्छित आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला. बाळासाहेब थोरात यांनी ‘कार्यक्रम भर उन्हात कुणाच्या सोयीसाठी घेण्यात आला ?’ असा प्रश्न उपस्थित केला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, ‘‘कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यवस्था उत्तम प्रकारे ठेवण्यात आली होती. उष्णतामान वाढल्याने हा प्रकार घडला. ‘विरोधीपक्ष यामध्ये अतिशय घाणेरडे आणि क्षुद्र राजकारण करत आहेत.’’
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६ लाख रुपयांच्या सोन्याच्या पादुका दान !
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !