राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्‍या भाषणांवर निर्बंध आहेत. यापूर्वी ज्यांनी अशी भाषणे केल्याची माहिती असेल, त्यांना अन्य भाषणाच्या वेळी लिखित सूचना देण्यात आली आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीविषयी अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी द्वेषात्मक भाषणे करणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.