
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – भारतात रहायचे असेल, तर ‘वन्दे मातरम्’ म्हणावेच लागेल. ही राज्यघटनेची भूमिका आहे. ही भूमिका अबू आझमी यांना मान्य करावीच लागेल. ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, हे विधान राष्ट्रद्रोही आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही’, या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
या वेळी अतुल भातखळकर म्हणाले, ‘‘अबू आझमी यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आणि सभागृह बंद पाडले. अबू आझमी हे सातत्याने अशा प्रकारची वादग्रस्त, देशद्रोही वक्तव्य करत असतात. त्यांच्या या विधानामुळे त्यांची देशद्रोही वृत्ती समाजापुढे आली. सभागृहाबाहेर त्यांनी जर अशा प्रकारचे देशद्रोही वक्तव्य केले, तर त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणीही आम्ही करू.’’
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !