मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – राज्यात बेपत्ता होणार्या मुलींचा प्रश्न गंभीर आहे. एक मुलगी बेपत्ता होत असली, तरी ते योग्य नाही. संपूर्ण देशाच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत मुली बेपत्ता होण्याचा महाराष्ट्राचा क्रमांक कितवा ? हे सांगणे योग्य नाही. ‘विधीमंडळात कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेच्या वेळी यावर सविस्तर चर्चा करू’, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रातून दिवसाला सरासरी ७० युवती बेपत्ता होतात तसेच पुणे येथून २ सहस्र ८५८ मुली बेपत्ता असल्याची माहिती सभागृहात दिली. याविषयी १८ जुलै या दिवशी स्थगन प्रस्ताव आणून चर्चा करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव नाकारला; मात्र या गंभीर प्रश्नाची सरकारने नोंद घेण्याचे निर्देश दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातून बेपत्ता होणार्या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
राज्यातून बेपत्ता होणार्या मुलींविषयी विधीमंडळात चर्चा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
नूतन लेख
- समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
- उष्णतेमुळे गोव्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
- पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन