गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई येथून २ सहस्र २०० जादा ‘एस्.टी.’ गाड्यांची सोय !
१० सप्टेंबरपासून चालू होणार्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली.