‘आप’चा नगरसेवक ताहिर हुसेन हाच देहलीतील दंगलीचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका
देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट
देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.
अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू केला आहे. अमेरिका ज्या प्रमाणे याकडे गांभीर्याने पहाता आहे, ते पहाता भारतियांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे !
‘नागोठणे (रायगड) येथील प्रार्थनास्थळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाजपठण होत असल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती मंच यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर येथील मशिदीतून घरीच नमाजपठण करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा करण्यात आली.
पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीचे उल्लंघन केल्याची भीती दाखवून करवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणार्या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
देशात सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) असतांना कांदिवली येथील राजेश हे त्यांच्या पत्नीसमवेत बाहेर जात होतेे. त्यावर त्यांच्या भावाने विरोध करून ‘अशामुळे त्यांच्या घरात कोरोना पसरेल’, असे सांगितले. राजेश यांना भावाने सांगितलेले न आवडल्याने त्यांनी भावाच्या डोक्यात तवा मारला.
बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !
एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. अशा वासनांधांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !