नाशिक येथील मुक्त विद्यापिठाच्या प्रश्नपत्रिकेत मनुस्मृती आणि रामदासस्वामी यांच्याविषयीच्या प्रश्नाला भाकपचा विरोध !

यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या ‘राज्यशास्त्र’ या विषयाच्या १२ जुलै या दिवशी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत मनुस्मृतीच्या संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी आहे, असे सांगून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) याचा निषेध नोंदवला आहे. 

मंदिर बंद ठेवून करण्यात येणार्‍या कृती कॅमेर्‍यासमोर होणे आवश्यक ! – ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान

गडावर असलेले भगवती सप्तश्रृंगीदेवीचे मंदिर येत्या २१ जुलैपासून अनुमाने दीड मास बंद ठेवण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला भाविकांनी हरकत घेण्यास प्रारंभ केला आहे. वणी देवस्थान विश्वस्त मंडळाने मनमानी पद्धतीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिहाद संपवण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत केले होते, हे लक्षात ठेवा ! – सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनी

‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे प्रमुख संपादक सुरेश चव्हाणके यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला अमरावती येथे उत्स्फूर्त प्रतिसाद !

गुरूंना आवडणार्‍या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निश्चय करा ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा.

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलैला !

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २० जुलै या दिवशी होणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा अतीवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

वर्धा येथे ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटनांचे प्रमाण कायम !

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने घोषित केलेल्या अनुमानावरून राज्यातील काही ठिकाणी ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आळंदीमध्ये (जिल्हा पुणे) माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यास भाविकांची गर्दी !

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहस्रो भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले

काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.

पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ! – शिवसेनेचे महापालिका प्रशासनास निवेदन

गतवर्षी आलेल्या महापुराच्या काळात रंकाळा परिसर, पंचगंगा नदी परिसर येथून बाहेर गेलेले नागरिक आत जाऊ शकत नव्हते आणि आत आलेले बाहेर येऊ शकत नव्हते. नागरिकांना वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत, अन्न पुरवठा, तसेच दैनंदिन गरजू वस्तू यांचाही तुटवडा भासला.