नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी अनुमती नाही !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुधारित याचिका केली होती; मात्र न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.

आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर येथे कोरोना पडताळणी केंद्र चालू करा ! – कर्नल विश्वास सुपनेकर, संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र

आषाढी यात्रेत विठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाने पंढरपूर येथे कोरोना पडताळणी केंद्र चालू करावे.

श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा ! – दत्तात्रय भरणे, वन राज्यमंत्री

सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, वन वणवा नियंत्रण ही कामे प्राधान्याने करून तसेच स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तात्काळ मार्गी लावावीत..

पाणीपुरवठ्याच्या नवीन कामाचा प्रस्ताव १५ जूनपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवा ! – संभाजीनगर खंडपीठ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४० दिवस कामामध्ये गंभीरपणे प्रगती केली नाही, याविषयी न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त करतांना प्रत्येक बुधवारी सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांचीही नोंद घ्यावी, असेही खंडपिठाने म्हटले आहे.

भोर (पुणे) येथील २ सहस्र ८४४ हेक्टर क्षेत्र ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित !

तालुक्याच्या हिर्डोशी आणि नीरा देवघर धरणांच्या खोऱ्यातील १४ गावांमधील वन विभागाच्या २ सहस्र ८४४ हेक्टर क्षेत्राला ‘संवर्धन राखीव क्षेत्रा’चा दर्जा (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) देण्यात आला आहे.

उजनी धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात !

उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपून पाण्याने तळ गाठला, त्यामुळे धरणाची पातळी मृतसाठ्यामध्ये गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उजनी धरण २१ दिवसांनंतर मृतसाठ्यात गेले आहे.

‘एन्.आय.एफ.’ आणि ‘ट्रायकोलर इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून गायीच्या शेणापासून श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यास प्रोत्साहन !

शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे निसर्गत:च गोमातेचे तत्त्व असलेल्या गोमयात श्री गणेशतत्त्व आकर्षिले जाऊ शकत नाही.

पर्यावरण वाचवा !

साधना करणाऱ्या व्यक्तीत निसर्गातील गोष्टींविषयी संवेदनशीलता असल्याने तिच्याकडून चांगल्याप्रकारे पर्यावरणरक्षणाचे प्रयत्न होऊ शकतात. सध्या होणारी पर्यावरणहानी ही येत्या आपत्काळाचे एक द्योतक आहे; परंतु तद्नंतर येणाऱ्या काळात मानवाला पुनश्च निसर्गाची पूजा करूनच स्वतःचा उत्कर्ष करावा लागणार, हे निश्चित !

सातारा येथे पत्रपेटीची चोरी !

बँका, पतसंस्था, विविध कार्यालये आदी प्रतापगंज पेठेत असल्यामुळे येथे पत्रपेटी अत्यावश्यक आहे. या पत्रपेटीच्याच चोरीमुळे आता नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.