‘इस्रो’ला स्वदेशी ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’च्या निर्मितीत यश !

इस्रोने कोरोनाच्या काळात रुग्णांना साहाय्यभूत ठरून ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’ची निर्मिती करणे कौतुकास्पद !

आधुनिक वैद्यांच्या सुरक्षेविषयी महाराष्ट्र सरकारला अजिबात गांभीर्य नाही !

आधुनिक वैद्यांनी त्यांचे सर्वस्व द्यावे, अशी अपेक्षा राज्य सरकार त्यांच्याकडून करते; मात्र आधुनिक वैद्यांची सुरक्षा करण्याविषयी राज्य सरकारला अजिबात गांभीर्य नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस्. कुलकर्णी यांनी एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारची कानउघाडणी केली.

मृत्यूनंतर कोरोनाबाधित रुग्णावर ३ दिवस उपचार !

मृताच्या टाळूवरचे लोणी खाणारे असंवेदनशील आधुनिक वैद्य ! असे माणुसकीशून्य, लोभी आणि रुग्णांना लुबाडणारे आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त करून कारागृहात पाठवले पाहिजे आणि अशी रुग्णालये बंद केली पाहिजेत !

चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही ‘अ‍ॅफकॉन’ आस्थापनाकडून काम चालू ठेवण्याचा आदेश !

तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५’ जहाज समुद्रात बुडून ३७ हून अधिक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन

अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी (वय ५६ वर्षे) यांचे २० मे या दिवशी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. १५ मे या दिवशी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचा मोठा मुलगा भार्गवराम काळे (वय २६ वर्षे) यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

(म्हणे) ‘आम्हाला बोलूच दिले नाही !’ – ममता बॅनर्जी यांचा आरोप

पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या जागतिक निविदेला ४ जणांचा प्रतिसाद !

लसीच्या तुटवड्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कोरोनावरील लसीचा पुरवठा करण्यासाठी काढलेल्या जागतिक  निविदांना केवळ ४ जणांकडून प्रतिसाद मिळाला आहे; पण या चारही जणांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही.

शासनाने पीडितांना तातडीने भरघोस हानीभरपाई द्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी शासनाने काही घोषणा केल्या होत्या; मात्र त्याची हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. शासनाने पीडितांना तातडीने हानीभरपाई द्यायला हवी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …..

‘म्युकरमायकोसिस’मुळे महाराष्ट्रातील ९० जणांचा मृत्यू !

‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य रोगामुळे आतापर्यंत राज्यातील ९० जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी लागणारा व्यय शासन देणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून यावरील उपचारांचा व्यय दिला जाईल.