मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी रसीद यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांकडून तलवारी घेऊन नाच !

समाजात दहशत पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

गुटखा विक्री प्रकरणी नवी मुंबईतील बाजार समितीतील ५ पान टपर्‍या सील

कृषी उत्पन्न बाजार समितीतील ५ पान टपर्‍यांवर अन्न – औषध प्रशासन विभागाकडून गुटखा विक्रीच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वरील कारवाई प्रकरणी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण तेलंगाणामध्ये नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार

राज्याचे मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस्. शर्मिला रेड्डी यांनी तेलंगाणा राज्यामध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा संकेत दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा संकेत दिला.

हमारी संस्कृति सदैव वचन निभाने में विश्‍वास करती है ।

अतः ये एक दिन #PromiseDay का हिन्दू संस्कृती में कोई स्थान नहीं है, यह समझ ले!

सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले.

न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी सलमान खान याने क्षमा मागितली

असे खोटे बोलणारे आरोपी आणि अविश्‍वासार्ह अभिनेते म्हणे तरुण पिढीचे आदर्श !

पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड  !

गेल्या काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी चालू होती. याआधी नोव्हेंबरमध्येही चौकशी करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वींच्या विदेशी चलन प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वीजदेयक माफीसाठी पुण्यात ‘बोंबाबोंब’ आंदोलन !

महावितरण आस्थापनाने वीजजोडणी तोडण्यासाठी दिलेल्या ७१ लाख नोटीसा रहित करण्यात याव्यात, घरगुती आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिक दुकानदारांचे संपूर्ण वीजदेयक माफ करावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

महागाई न्यून करण्यासाठी अनुदान आणि सेवा कर रहित करणे

‘फूड सिक्युरिटी’मध्ये ५० सहस्र कोटी रुपयांचे धान्य प्रतिवर्षी कुजते. ते कसे, तर २ लाख कोटी रुपयांचे अन्नधान्य, तेल आयात करतो. २ लाख कोटी रुपयांच्या निर्यातीसाठी सबसिडी देतो आणि ५० सहस्र कोटीचे धान्य कुजते, म्हणजे प्रतिवर्षी ४ लाख ५० सहस्र कोटीचे कर लादल्यामुळे महागाई वाढते.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अमरावती जिल्ह्यातील २४ गावांत वीजच नाही ! – खासदार नवनीत राणा

संसदेचे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी विनंती करते की, केंद्र शासनाने या गावांना वीज जोडणी देण्यासाठी ‘विशेष योजना’ आखून त्यासंबधीचे आदेश द्यावेत..