कोरोनाचे संकट असल्याने शिवजयंती उत्सव शांततेत साजरा करावा !

कोरोनाचे संकट अद्यापही संपूर्णपणे गेलेले नाही. या स्थितीत सण आणि उत्सव सुरक्षित वातावरणात अन् साधेपणाने साजरे करावेत.-अजित पवार

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषदेच्या उपसभापती

केंद्र सरकारने असंघटित कामगारांना वार्‍यावर सोडले आहे.

ध्वजसंहिता डावलून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

करवीरतालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर धारिकेमधील माहितीत पालट करून चौकशीचा आदेश रहित करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशाच्या धारिका गुप्त असतात. असे असतांनाही हा प्रकार घडणे धक्कादायक आहे.

आनेवाडी पथकर नाका हस्तांतरण प्रकरणात खा. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता

पथकर नाक्यावर जमावबंदीचे आदेश असतांनाही खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जमाव केल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी खा. उदयनराजे यांच्यासह ११ कार्यकर्त्यांची वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

बँकेचा विलिनीकरणाचा प्रस्ताव मार्गी लावावा !

रूपी बँक ठेवीदार हक्क समितीकडून यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत रिझर्व्ह बँकेला याविषयीची भूमिका मांडावी लागणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस अन् शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन ! 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !

चीनकडून भारताच्या विश्वासाला तडा ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !