कळंबणी बु. (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री भैरी चाळकोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि दानपेटीतील रकमेची चोरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! हिंदूंच्या धार्मिक स्थानांच्या संदर्भात अशा घटना सातत्याने घडणे, हे हिंदूबहुल भारतासाठी लाजिरवाणे !

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला होत असलेल्या विरोधाविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना माहिती देण्यात आली आहे

म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील म्हादई जलतंटा न्यायालयाबाहेर मिटवणे अशक्य आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हादई जलतंटा लवादाने म्हादईच्या पाणी वाटपासंबंधी निवाडा यापूर्वी दिला आहे.

आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर अल्प झाले !

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्यांचे दर ५० टक्क्यांनी अल्प झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी !

अपत्य जन्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या विरोधातील खटल्याची पुढील सुनावणी २ डिसेंबर या दिवशी होणार आहे.

गोव्याच्या पर्यटन धोरणाला चर्च संस्थेचा विरोध

राज्याचे पर्यटन धोरण हे गोवा आणि गोमंतकीय यांच्या हितासाठी नाही. हे पर्यटन धोरण स्थगित ठेवावे, अशी मागणी चर्च संस्थेशी निगडित ‘सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम्’ने गोवा शासनाकडे केली आहे.

गोव्यात डिसेंबर मासात जिल्हा पंचायत निवडणुका

गोव्यात डिसेंबर मासात जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा विद्यालयांना आदेश

पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांचा शैक्षणिक वर्षाचा निकाल ८ मे २०२१ पर्यंत सिद्ध ठेवण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. शिक्षण संचालनालयाने या आदेशात पुढे म्हटले आहे की, पहिली ते नववी आणि इयत्ता ११ वी यांच्या अंतिम परीक्षांचा निकाल ८ मे २०२१ किंवा त्यांनर घोषित करावा.

गोव्यातील भाजप सरकारचे मातृभाषाविरोधी धोरण केंद्रशासनाच्या धोरणाविरुद्ध ! – प्रा. सुभाष वेलींगकर, सहनिमंत्रक, भा.भा.सु.मं

केंद्र सरकार मातृभाषा पोषणासाठी जे करते, त्याच्या एकदम उलटे मातृभाषाविरोधी धोरण गोव्यात भाजप पक्ष आणि त्यांच्या सरकारने स्वीकारले आहे. ही अतिशय दुर्दैवी, निर्लज्ज आणि दुटप्पी नीती आहे, असे प्रतिपादन भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलींगकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.