लडाख येथे दिशा भरकटून भारतीय सीमेत आलेल्या चिनी सैनिकाला भारतीय सैनिकांनी पकडले

चीनचे सैनिक बेशिस्त आहेत म्हणून ते दिशा भरकटकात कि चीन त्यांना जाणीवपूर्वक भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाठवतो ?

आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी मेळावली ग्रामस्थांशी चर्चा करण्यास सिद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

शासनाकडून नियोजित आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यास मी सिद्ध आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ९ जानेवारीला पत्रकारांशी बोलतांना केले.

शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे भाजी मंडईच्या कामाला विलंब – कंत्राटदार

कणकवली शहरातील अनेक भूमींचे आरक्षण निधीअभावी नगरपंचायतीला विकसित करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन ग्लोबल असोसिएटने केले आहे.

निधन वार्ता

लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील सनातनच्या साधिका सौ. शशिकला शामराव टेमकर यांचे वडील कै. गुलाबराव भिकाजी शेवाळे (वय ९३ वर्षे) यांचे  ७ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता निधन झाले.

शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावरील अत्याचार, हा भाजपचा माझ्या विरोधातील सूडचक्राचा भाग ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

या मारहाणीत शैलेंद्रचा ‘इअरड्रम’ फाटला असून डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. त्याला हेतूपुरस्सर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न तपासता, म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊसतोडणी कामगारांची उणीव असल्याने शेतकर्‍यांचा स्वतःच ऊसतोडणी करण्याचा निर्णय

असळज (तालुका गगनबावडा) येथे डॉ. डी. वाय. पाटील ऊस कारखाना निर्मितीनंतर जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी या दोन तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख टन उसाचे उत्पादन होते. यंदा कोरोनामुळे बीड, परभणी यांसह विविध भागांतून ऊसतोडणीसाठी येणारे कामगार अल्प आले आहेत.

पावसामुळे पुण्याच्या प्रदूषणात घट !

३ शहरांच्या तुलनेत पुणे शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निरीक्षण

मुरुंबा (जिल्हा परभणी) येथे ८०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी !

‘बर्ड फ्लू’च्या आजाराचे संकट घोंगावत असतांनाच घडलेली ही घटना चिंताजनक आहे ! 

मुंबई शहरातील शेकडो रुग्णालयांकडे अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र नाही !

अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र न घेणार्‍या रुग्णालयांवर प्रशासन का कारवाई करत नाही ?

नगर येथील केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याची शक्यता

VRDE संस्था स्थलांतरित केल्यास स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे.