२४ ते २९ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस
२७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
२७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या ६ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी जिजाऊ चौक येथे सव्वा घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगाचे पथक २७ सप्टेंबरला राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, निवडणुका राबवणार्या यंत्रणा, तसेच पोलीस अधिकारी यांची भेट घेतील, तर २८ सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
वाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय !
अशा प्रकारे प्रतिदिन तस्करी करणार्यांना अटक केल्याची वृत्ते येतात; पण त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, हेही उघड व्हायला हवे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !
पुणे, तसेच सातारा जिल्ह्यांतील मंदिरातील देवतांच्या मूर्ती चोरणारी टोळी सुपे (ता. बारामती) येथील पोलिसांनी पाठलाग करून कह्यात घेतली आहे. या प्रकरणी आरोपी ओंकार साळुंखे, तुषार पवार, सौरभ पाटणे यांसह एका अल्पवयीन तरुणाला कह्यात घेतले आहे.
संकल्पनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला संमती मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! या दोघांसमवेत आणखी कुणाचा सहभाग आहे ? याचीही चौकशी पोलिसांनी करावी !
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आरंभ करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार पुणे वर्तुळाकार रस्ता, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पॉडटॅक्सी, कांजूरमार्ग कारशेडसह इतर कारशेडचे भूमीपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे का ? संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !