बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेतील २० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

निर्दोष असूनही २० वर्षे कारागृहात रहावे लागणे, हा घोर अन्याय नव्हे का ?

तृणमूलचा विजय झाल्यास मौलाना आणि इमाम यांचे मानधन वाढवू !

तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हाकिम यांचे मशिदीमधून आश्‍वासन : हिंदु नेते कधी ‘पुरोहित, पुजारी यांना मानधन देऊ’ किंवा ‘असलेले मानधन वाढवू’, असे आश्‍वासन देत नाहीत; त्यांची मतपेढी नाही, हे लक्षात घेऊन हिंदूंनी त्यांची मतपेढी निर्माण करावी !

कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध !

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ग्वाही

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्‍वर मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील १६ देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती 

सरकार एकीकडे स्वतःच्या मालकीच्या आस्थापनांचे खासगीकरण करत असतांना मंदिरांचे सरकारीकरण करत आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना मशीद, चर्च यांचे सरकारीकरण न करता केवळ हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे !

गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविषयी आवाज उठवीन ! – सुभाष देशमुख, आमदार, भाजप

गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून आवाज उठवीन, असे आश्‍वासन भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी अ. भा. कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना दिले.

पानवण (सातारा) येथील आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे यांचे अपहरण

सातारा, १ मार्च (वार्ता.) – म्हसवड तालुक्यातील पानवण येथे २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी शेताच्या कामानिमित्त गेलेले आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे रात्री उशिरापर्यंत परत आले नाहीत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इतिहासात प्रथमच जोतिबा डोंगरावर खेटे भाविकांविना !

कोल्हापूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणारे सर्व रस्ते प्रशासनाने २८ फेब्रुवारी या दिवशी बंद केले.

कर्नाटकने अवैधरित्या म्हादईचा जलप्रवाह वळवला आणि कळसा पात्राचे पाणी पहिल्यांदाच सुकले !

म्हादई जलवाटप तंटा लवाद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे प्रविष्ट असतांनाही कर्नाटक राज्य अनधिकृतपणे म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणे चालूच ठेवत असल्याचे उघड झाले आहे.

कुणकेश्‍वर यात्रा रहित; मात्र नित्योपचार चालू रहाणार ! – पालकमंत्री उदय सामंत

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या विश्‍वस्तांसह पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

सांगली येथे काळ्या खणीतून १५ दिवसांत महापालिका कर्मचार्‍यांनी १३ टन कचरा काढला !

सांगली – सांगलीच्या मध्यवर्ती असणारी काळी खण गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.