जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते !
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २१ मे या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. या ट्वीटमध्ये त्यांनी राजीव गांधी यांचे ‘जेव्हा कोणताही मोठा वृक्ष कोसळतो, तेव्हा भूमी थरथरते’, असे वाक्य लिहिले. नंतर त्यांनी हे ट्वीट हटवले.