
‘२५.२.२०२५ या दिवशी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. मी नामजप करत असतांना मला ‘प्रभु श्रीराम रामेश्वरम् येथील शिवपिंडीवर बिल्वपत्र वहात आहे आणि भगवान श्रीकृष्ण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दुग्धाभिषेक करत आहे. ती सर्व बिल्वपत्रे आणि दूध रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या कळसावर पडत आहेत’, असे दृश्य पूर्णवेळ दिसत होते.’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रय नारकर (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.२.२०२५)
|