१. क्रियायोग : सर्व क्रियांमध्ये भगवंत पहाणे, म्हणजे ‘क्रियायोग’ होय. ‘सर्व क्रिया भगवंताच्याच आहेत’, असा दृढनिश्चय झाला म्हणजे ‘क्रियायोग’ साधला. भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो.
२. संसारात भगवंत मिसळला की, तो आपोआप होत रहातो. पुनःपुन्हा मिसळावा लागत नाही.
३. अतीवाचनाने आत्मा रक्तबंबाळ होतो.
४. स्वामीचरण दृढ धरल्यावर व्यवहारातील दैन्य नाहिसे होऊन अन्य कुणाच्या चरणी लागावे लागत नाही.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)