Tushar Gandhi On Hindutva:(म्हणे) ‘कट्टरवादी हिंदुत्वाचा देशाला धोका !’

मोहनदास गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा हिंदुद्वेष !

मुंबई – जे हिंदु म्हणून सर्वांचा स्वीकार करतात, त्यांच्यासमवेत आमचा काहीही वाद नाही. हिंदुत्वासमवेत आमचा वाद नाही; परंतु कट्टर हिंदुत्वनिष्ठ लोकांना वगळतात. जे ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब असल्याच्या) गोष्टी करून लोकांमध्ये भेदभाव करतात, त्या कट्टर हिंदुत्वनिष्ठ लोकांचा देशाला धोका आहे, असे वक्तव्य मोहनदास गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. (कट्टर हिंदुत्वनिष्ठांनी देशासाठी कोणता धोका निर्माण केला आहे, याचे एकतरी उदाहरण तुषार गांधी देतील का ? उलट धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मोहनदास गांधी यांनीच देशाला धोका दिला, हाच इतिहास आहे ! – संपादक)

तुषार गांधी यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून ते महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत.

संपादकीय भूमिका

‘कट्टरतावादी मुसलमान आणि जिहादी मुसलमान यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, काश्मीरमधून हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडण्यात आले, हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमणे केली जातात, या घटना देशासाठी धोकादायक ठरत नाहीत; मात्र देशाच्या रक्षणासाठी हिंदुत्वाची कास धरणारे हिंदु मात्र देशाला धोका ठरतात, अशा प्रकारचे विचार मांडणारे तुषार गांधी हे मोहनदास गांधी यांचे खरे वारस आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !